Loksabha 2019 : पावणेनऊ कोटी महाराष्ट्रात मतदार

Voter
Voter

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून १४ लाख ४० हजार एकूण मतदारांमध्ये सात लाख ३५ हजार ५९७ एवढ्या महिला मतदारांची संख्या आहे. ठाणे मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे २३ लाखांहून अधिक मतदारांची संख्या असून १२ लाख ६० हजारांहून अधिक पुरुष मतदारांची संख्या आहे.

राज्यात ११, १८, २३ आणि २९ एप्रिल या चार टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. सुमारे सहा लाख कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे. राज्यात ४ कोटी ५७ लाखांहून अधिक पुरुष मतदार असून ४ कोटी सोळा लाखांहून अधिक महिला मतदार आहेत.

नऊ मतदारसंघ राखीव
नंदूरबार, गडचिरोली-चिमूर, दिंडोरी, पालघर हे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com