Electioin Results : मोदींपुढे 25 वर्षे कोणी टिकणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई : आजच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर देश मोदीमय झाल्याचे दिसत आहे.देशाचा कौल विरोधकांनी स्वीकारला पाहिजे. मोदींसमोर कोणी टिकू शकले नाही, हे सत्य आहे. पुढील 25 वर्षे कोणीच त्यांच्यापुढे उभे राहू शकत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (गुरुवार) जाहीर होत असून, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळाले आहे. एनडीएला जवळपास 350 जागा मिळण्याची शक्यता आहे. या विजयानंतर एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले, की 2104 प्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मोठा विजय मिळविला आहे. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, तेथेही भाजपने विजय मिळविला आहे. देशाने पुन्हा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. पुढील पाच वर्षांत मोदी देश आणखी पुढे घेऊन जातील. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशाची प्रगती होईल. आता विरोधकांकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षाचे लोकशाहीमध्ये स्थान आहे. पण, इतक्य़ा मोठ्या प्रमाणात जनतेने विरोधी पक्षाला का नाकारले, हे आता पाहायला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com