Loksabha 2019 : रामदास आठवले यांची भाजपवर जाहीर नाराजी

Ramdas-Athawale
Ramdas-Athawale

मुंबई - लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेलाही असे वाटत आहे. मात्र भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावे, असे अजून वाटत नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

भाजपला वाटते, की मी दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी; तर शिवसेनेला वाटते मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढावी. मात्र या दोन्ही जागांपैकी एक जागा रिपब्लिकन पक्षाला निश्‍चित मिळावी, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. आज ते येथे जाहीर सभेत बोलत होते.

आठवले म्हणाले, की येथे शिवसेना-भाजप असा वाद करू नका. आता युती झाली आहे. आम्ही युतीसोबत आहोत. आम्हाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप यांनी प्रत्येकी एक जागा सोडली पाहिजे. या जागांवर आमचे  उमेदवार सहज विजयी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com