Loksabha 2019 : दानवेंच्या पराभवाचा निर्धार कायम : बच्चू कडू 

Loksabha 2019 : दानवेंच्या पराभवाचा निर्धार कायम : बच्चू कडू 

जालना : राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातील सर्व ठिकाणी जाता आले नाही; मात्र रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून, वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी जालन्यात सांगितले.

कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. तत्पूर्वी गुरुवारी (ता. 28) बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केलेल्या एका शब्दावरून मी दानवे यांच्याविरोधात लढण्याचा निर्धार केला. माझ्या विजयापेक्षा त्यांचा पराभव महत्त्वाचा आहे. राजकारण भावनेने नाही, तर मतांच्या संख्येने होत असते. त्यामुळे मी उभा राहूनही दानवे निवडून आल्यास वेगळा संदेश जाईल. ही लढाई शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि अस्तित्वाची आहे.

दानवे यांच्या घरासमोर नारळ फोडून प्रचाराला सुरवात करणार आहे. गुरुवारी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन लढण्याचा निर्णय घेणार असल्याचेही आमदार कडू यांनी सांगितले. 

बच्चू कडूंनी लढावे

संवाद बैठकीत ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी उभे राहावे, अशी भावना व्यक्त केली. बैठकीत अनेकांनी वर्गणी गोळा करून प्रचार करण्याची तयारीही दाखविली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही संपूर्ण मदत करण्याची तयारी दर्शविली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com