कारणराजकरण : वाकड भागात पाण्याची मोठी समस्या : नागरिक

wakad
wakad

वाकड (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगपालिका हद्दीतील वाकड भागात पाण्याची मोठी समस्या असून टँकरने पाणी आणावे लागत असल्याचे वाकड परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोबतच वाढत्या औद्योगिकीकरणामुळे होत असलेली वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर त्रासदायक ठरत असल्याचे येथील नागरिक सांगतात.

सकाळच्या 'कारणराजकारण' मालिकेअंतर्गत वाकड परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक स्थानिक अडचणी मांडण्यात आल्या. मेट्रोचा प्रश्न आणि तिच्या रचनेत चुका असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. सोबतच वाढती बेरोजगारी आणि बी आर टी मुळे होत असलेला त्रासही नागरिकांनी सांगितला. 

मुळा, इंद्रायणी नदीत होणारे प्रदूषण वाढत आहे, त्यावर लक्ष द्यायला हवे. धरणातील गाळ काढण्याचे काम करायला हवे. मागे आपण पवना धरणातील गाळ काढला असल्याच्या बातम्या वाचल्या असतील त्याचे स्वागत पण तरीही पाणीप्रश्न आहेच. मग यावर काही ठोस उपाय योजना का होत नाही हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गावा-गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सकाळने सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधला. स्थानिक प्रश्नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणली. कारण राजकारण या मालिकेतील हा शेवटचा भाग होता, यामध्ये वाकडच्या नागरिकांनी भाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com