मुंबई : ईशान्य मुंबईच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्यावी. त्यांनी मला उमेदवारी दिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवेन.
ईशान्य मुंबईतील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. येथील शिवसैनिकांनी वेळप्रसंगी भाजपविरोधात मतदान करण्याचे किंवा शिवसेनेचा उमेदवार देण्याची तयारी सुरु केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ईशान्य मुंबईतून कोणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता आठवले यांनी हे वक्तव्य केले आहे.
याबाबत आठवले म्हणाले, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाइंला मिळाल्यास तेथून मी निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील मतदार मला ओळखत असून, यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. तेव्हा मला 2 लाख 25 हजार मतं मिळाली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.