राज्यात १८ जणांचा बुडून मृत्यू

Drown
Drown

मुंबई - गणेश विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून १८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.

अमरावती, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारा, नांदेड, नगर, अकोला आणि सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये वाहून गेल्याने १८ जणांचा मृत्यू झाला. यात अमरावतीमधील चार, रत्नागिरीतील तीन, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामधील प्रत्येकी दोन आणि ठाणे, धुळे, बुलडाणा, अकोला, भंडाऱ्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ठाण्यात कल्पेश जाधव (वय १५) हा कसारा येथील मुलगा काल सकाळी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना वाहून गेला, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अमरावतीमधील वाटोळे शुक्‍लेश्‍वर गावातील पूर्णा नदीतून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नाशिकमध्ये दोन जण वाहून गेले. गोदावरी नदीवरील रामकुंड येथून वाहून गेलेल्या प्रशांत पाटील (वय ३८) यांचा मृतदेह आढळला आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील पहिणे गावातील तळ्यात बुडून युवराज राठोड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला. 

भंडाऱ्यातील डोलसर गावातील तलावातून सोमा शिवणकर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कऱ्हाडमधील कोयना नदीत मलकापूरचा चैतन्य शिंदे (वय २०) हा युवक वाहून गेला, तर अकोल्यात विकी मोरे (वय २७) हा पाण्याने भरलेल्या खाणीत विसर्जनासाठी गेला असताना बुडाल्याचे सांगण्यात आले. 

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे जण बुडाल्याची घटना घडली. यातील एकाला वाचवण्यात यश आले, तर जयवंत बाबू मोरे हा तरुण वाहून गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com