राज्यात ७८ टक्के खरिपाची पेरणी

Agriculture
Agriculture

सोलापूर - महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. प्रतीक्षेनंतर पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७८ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मात्र, आता पावसाने दडी मारल्याने आता खरीप पिके धोक्‍यात आली आहेत.

दुष्काळाने हतबल झालेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मान्सून लांबल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. विलंबाने पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पेरणी झालेली पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने विदर्भ, मराठवाड्याच्या बहुतांश भागात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक भागात शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

राज्यात १ जून ते २२ जुलै कालावधीचा सरासरी पाऊस ५०९ मिलिमीटर असून २२ जुलै २०१९ अखेर ३८३.६० मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ७५.३६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) १४०.६९ लाख हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी १०९.८२ लाख हेक्‍टर क्षेत्रावर (७८.०७ टक्के) आतापर्यंत पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, रागी, तूर, उडीद, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस या पिकांच्या प्रामुख्याने पेरण्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com