
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात विरोधकांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांना देण्यात आलेली तुटपुंजी मदत यावरून सरकारला घेरले आहे. दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.(Abdul Sattar visit to vidarbha during the assembly session)
विदर्भात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी उद्धवस्त झाल्या. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी विदर्भ दौऱ्यावर आलो आहे. अशी माहिती मंत्री सत्तार यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करा. त्यांना धीर द्या. सरकार तुमच्या पाठीशी असल्याची हमी द्या. नुकसानीचे पंचनामे करताना पक्षपात होऊ देऊ नका. कोणताही शेतकरी सुटणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.
नागपूर विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मी शरद पवारांची भेट घेणार आहे. शेती बाबत चर्चा करण्यासाठी सत्तारांनी पवारांची वेळ मागितली आहे. तसेच पूरग्रस्त शेतीचा तीन दिवसाचा दौरा केल्यानंतर राज्यपालांनाही अहवाल घेऊन सोमवारी भेटणार असून मदती संदर्भातली घोषणा अधिवेशनात करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितले.
तसेच, पत्रकार परिषदेत बोलताना, कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर, कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांचा दिनचर्या समजून घेतली. शेतकरी किती घाम गाळतो किती रक्त जाळतो. तो निंदन करेल तर आम्ही पण ते निंदन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल की कृषिमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील.
त्यापासून आम्हाला शेतकऱ्यापासून शिकायला मिळेल, त्यांच्या अडचणी काय समजतील. जेव्हा अडचणी माहित पडेल तेव्हा त्यावर उपाययोजना काय करायचं हे माहित पडेल, याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे अशी योजना लवकरच आणणार असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
यासोबतच, जुलै महिन्यात नुकसानीचे पंचनामे झालेत. पण ॲागस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झाले नाहीत, लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. ज्याला नुकसानभरपाई मिळणार नाही त्या सर्वांची काळजी घेणार. गावात जाऊन ग्रामपंचायत असो की मंदिर, मशिद या भोंग्यावरून पंचनामा करण्यासाठी आल्याची माहिती दिली जाईल, असही सत्तार यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.