Raigad-Shivaji-maharaj
Raigad-Shivaji-maharaj

संवर्धनात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई - उद्धव ठाकरे

मुंबई - रायगड संवर्धनाच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना आज दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांची (हिंदवी स्वराज्याची) राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धानचे काम महाराष्ट्र सरकारने हाती घेतले आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. संवर्धनाची काही कामे सुरळीत सुरू आहेत, मात्र महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे; तसेच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई; तसेच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी संभाजीराजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

संभाजीराजे म्हणाले की, रायगड संवर्धनाची जी कामे सुरू आहेत त्यापैकी रायगडाच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये किल्ल्याच्या डागडुजीसाठी खर्च केले जाणार आहेत; तर १४७ कोटी रुपये हे महाड ते रायगड किल्ल्यादरम्यानच्या रस्त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. तर, रोपवेच्या कामातही मनमानी कारभार पाहायला मिळत आहे. रोपवेचे काम करणारे संबंधित लोक कोणत्याही परवानगीशिवाय रोपवेची क्षमता वाढवत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com