पुणे: मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांना त्यांच्या नथुराम-सावरकर प्रेमासाठी ओळखलं जातं. त्यांनी आज सावरकरांविषयी महत्त्वाची विधाने करताना म्हटलंय की, २०१४ नंतर सावरकरांना सतत टार्गेट केलं जात आहे. दुसरं कुठलंच नाव येत नाही. हिंदुत्ववादी अनेक नेते होऊन गेले पण त्यांना टार्गेट केलं गेलं नाही. मात्र, सावरकरांनाच जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय.
पुढे त्यांनी म्हटलंय की, सावरकरांनी एक कणभरही हिंदुत्वाला तिलांजली दिली नाही. हिंदुत्वाच्या भल्यासाठी मी काम करीत राहणार अशीच सावरकरांची भूमिका होती. बाकी इतर हिंदुत्ववाद्यांनी राजकारणासाठी कुठंतरी तोडजोडी केल्या, हिंदुत्वासाठी तडजोड केल्या. पण सावरकरांनी नाही केली.
ते म्हणाले की, सावरकर हे भारतरत्नच नाहीत तर विश्वरत्न आहेत. मात्र, सावरकरांवर शिंतोडे उडवायचे असं करुन सावरकरांना बदनाम केलं जात आहे. ८० टक्के हिंदूंना दुखवायचे असेल तर सावरकरांना बदनाम करायचे, हे काम सुरू आहे.
संभाजी ब्रिगेडबद्दल बोलताना ते म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही जी संस्था आहे, त्यांच्या नावातच छत्रपती नाही, मग आम्ही शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांना नुसतं शिवाजी म्हणलो की ते समोर येतात.
पुढे ते म्हणाले की, कट्टरता हिंदूंमध्ये येऊ शकत नाही. जिथं नियम येतात, घटना येते तिथं कट्टरता येते. हिंदू धर्मामध्ये ही भानगड नाही. कारण मुळात धर्म आहे. इतर धर्मसंस्था आहेत. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार धर्मसंस्थांची निर्मिती केली. देवाला शिव्या देणारा, नास्तिक असतानाही तो हिंदूच असतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.