शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा ‘आरपार’ची लढाई    

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा ‘आरपार’ची लढाई    

औरंगाबाद - सरकारने दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरे तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही ‘प्रधानमंत्री पीक बीमा योजना’ नव्हे तर ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना’ असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज केली. 

सध्याच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी पुन्हा एकदा ‘आरपार’ची लढाई करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भातील दुष्काळाची तीन दिवस पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बुधवारी येथे शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्जमाफी नाही, कर्ज मिळत नाही, दुष्काळामुळे जवळ पैसा नाही, अशा विचित्र संकटात शेतकरी सापडले आहेत. चारा छावण्या हळूहळू बंद पडत चालल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com