Ajit Pawar
Ajit PawarSakal

'पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार'

सांगली: पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याची ग्वाही सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.येत्या दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार यावर निर्णय घेईल अशी माहिती ही यावेळी त्यांनी दिली.पूरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आज सातारा, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. Ajit-Pawar-Sangli-flood-inspection-visit-update-akb84

महाराष्ट्रात सध्या सात जिल्हे पूर बाधित झाले आहेत. काही ठिकाणी मनुष्यहाणी तर अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाने पथके पाठवली आहेत. सांगलीमध्ये सध्या एनडीआरएफ ची दोन पथके कार्यरत आहेत. शिराळा, वाळवा, पलूस ,कडेगाव या ठिकाणी 130 गावे बाधित आहेत. सांगली, मिरज, कुपवाड मधील अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पवार म्हणाले, सहा जिल्ह्यात सध्या 64 जण बेपत्ता आहेत. रत्नागिरी 1200 जण स्थलांतरित झालेले आहेत. तळीयेमध्ये दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. राज्य सरकारचा केंद्र सरकारशी समन्वय आहे. लवकरच पूर व्यवस्थापन करणारी यंत्रणा अधिक सक्षम करणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली.यावेळी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com