योग्यवेळ आली की आम्ही प्रत्येकाची काळजी घेतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण

'काही तथ्य नसणारे आरोपही केले जातात, पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते'
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Summary

'काही तथ्य नसणारे आरोपही केले जातात, पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते'

सध्या राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार टोलेबाजी सुरु आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतित्त्युर दिले आहे. आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही. कुणाची काळजी घ्यायची असते ती योग्यवेळी आली की आम्ही घेत असतो, असं वक्तव्य त्यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल विचारले असता केलं आहे.

ते म्हणाले, विरोधकांनी मुंबई महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे, पण असे आरोप विरोधकांकडून होत असतात. कोणीही आरोप करतं, काही तथ्य नसणारे आरोपही केले जातात. पण तथ्य असेल तरच त्या आरोपाची दखल घेतली जाते, असंही पवार म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची टंचाई जाणवणार नाही, याची दक्षता राज्य सरकार घेत आहे. त्यासाठी नुकतीच खरिप हंगामात लागणाऱ्या बी-बियाणे आणि खतांसदर्भात खरिपपूर्व आढावा बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री आणि माझ्याशी चर्चा केल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपच्या चंद्रकात पाटलांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रासह देशात वाढत असणाऱ्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ओमायक्रॉनचे BA4 आणि BA5 हे सब व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना केसेसमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्याकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, सोळा देशांमध्ये BA4चे जवळपास 700 पेक्षा अधिक रुग्ण तर 17 देशात BA5चे 300 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचे विषाणूचे हे सब व्हेरिएंट संसर्गजन्य असले तरी ते घातक नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण असं असलं तरी नागरिकांनी काळजी घेणे आणि सतर्क राहणे अधिक गरजेचे आहे. त्यासोबतच आरोग्य विभागालाही नव्या व्हेरिएंटची चौकशी करण्यास सांगितले असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar
'पवार कुटूंबाची मोठी परंपरा, जान ठेवून राजकारण करा'

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील त्याची माहिती घेण्यास सांगितलं आहे. मुंबईला गेल्यावर अधिक चर्चा करुन आणि आवश्यकता असल्यास जनतेला त्यासंदर्भात काळजी घेण्यासाठी सूचना देऊ, असही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com