छत्रपती संभाजीनगर - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
अंबादास दानवे म्हणाले की, जालन्यातील मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन ४ दिवसांपासून सुरू आहे. या गावात लोक उपोषणाला बसले होते. त्यावेळी चर्चेसाठी आलेल्या पोलिसांनी उपोषणाला बसलेल्या महिला, मुलं आणि पुरुषांवर लाठीचार्ज केला.
दीड वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. या दीड वर्षात सरकारने काय केलं, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. ते पुढं म्हणाले की, सरकार केवळ बोलघेवड्या गोष्टी करत आहे. सह्याद्रीवर बैठक घेतं. त्यातून काय साध्य झालं. केवळ बोलाची कढी अन् बोलाचाच भात आहे. त्यात सरकार आंदोलन दडपू पाहात आहे. आंदोलन दडपल्याने थांबणार नाही, तर उलट ताकदीने उभं राहिल.
आंदोलनाची एक ठिणगी मोठ्या ज्वाळा निर्माण करू शकते. मराठा समाज आरक्षणाची ज्वाळा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रात मोदी-शहा यांचच सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे नेतृत्व मान्य करतात. मग संसदेत ठराव आणून ५० टक्के आरक्षणाची मार्यादा उठवण्यास काय अडचण आहे, असाही प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.