Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत

अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र...
Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत

अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही मुंबई महापालिका प्रशासनानं स्वीकारला नाही. यामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान यासर्व वादात मनसे नेत्याने खळबळजनक ट्विट केले आहे. (Andheri ByElection Anil Parab Rutuja Latke BMC Mumbai Uddhav Thackeray MNS maharashtra politics )

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली असून यावर आज 11 वाजता सुनावणी होणार आहे. मात्र, यापूर्वीच मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठीच अनिल परब यांचा हा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा सगळा डाव एकनाथ शिंदे गटाचा असल्याचं अनिल परब म्हणत होते. मात्र, मनोज चव्हाण यांनी आता यात ठाकरे गटाचाच हात असल्याचा दावा केला आहे.

Andheri By-Election : लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच...मनसे नेत्याचे ट्विट चर्चेत
Eknath Shinde: राजकीय करिअर धोक्यात आलं अन्...CM शिंदेंनी बोलून दाखवली ती मनातील खंत

नेमकं काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच.....असं सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने अद्याप स्वीकारलेला नाही. त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही. दुसरीकडे नियमानुसार शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही.

याच कारणामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. असे असताना आता ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या (१३ सप्टेंबर) तातडीची सुनावणी होणार आहे. अशी माहिती विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com