आज दिवसभर शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांनी आरोप-प्रत्यारोप केले आहेत. यामध्ये काॅंग्रेस मंत्र्यांनीही विरोधकांवर टीका केली आहे. होळीचा सण हा दोन दिवसांचा सण आहे. तो काही वर्षभर साजरा करणारा सण नाही. राज्यात सुरु असलेली राजकीय धुळवड ही अत्यंत दुर्देवी आहे. लोकशाहीला हानिकारक असल्याची टीका काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विरोधकांवर केली.
व्यक्तिगत राजकारण करू नये. राजकारण हे विकासाचे असावे. व्यक्तिगत आरोप आणि त्यातून होणार द्वेष हा सर्वांना मारक असतो.
पुढे ते म्हणाले, व्यक्तिगत राजकारण करू नये. राजकारण हे विकासाचे असावे. व्यक्तिगत आरोप आणि त्यातून होणार द्वेष हा सर्वांना मारक असतो. म्हणून होळी एक दिवसाची, धूळवड एक दिवसाची साजरी करावी. प्रेमाचे संबंध सर्वांचे असावे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपांची धूळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही असेही ते म्हणाले.
काय घडलं दिवसभरात
आज विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत धूळवड साजरी केली आहे. दिवसभरात राजकीय क्षेत्रात टीका-टीप्पणीची धूळवड नेत्यांनी खेळली आहे. यामध्ये आगामी पालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. तर भाजपा महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही असा निशाणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. याला चंद्रकांत दादांनी प्रत्यूत्तर दिले. काहीही झाल तरी भाजपाला पुन्हा येऊ देणार नाही असे ते म्हणाले. तर राऊंतावर बोलायच नाही अस आम्ही ठरवलय. त्यांच्यावर बोलून बोलून आपण त्यांना मोठ केल असा राऊतांवर टोला लगावला. भाजप उधळत असलेले रंग बनावट आहेत भाजपाचा रोजचाच शिमगा सुरु आहे. असा टोला राऊतांनी लगावला. राऊतांच्या या टिकेला रावसाहेब दानवे यांनी प्रत्यूत्तर दिले. आमचा रंग ओरिजनल आहे असा निशाणा त्यांनी लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.