"अवकाळी पावसाचा मोठा फटका; राज्य सरकारने त्वरीत मदत करावी"

पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवावी. तसेच या संदर्भात राज्य सरकारने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केली.
Dr. Bharati Pawar
Dr. Bharati Pawar टिम ई सकाळ

गेल्या ७ मार्चपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. सुरवातीला उत्तर महाराष्ट्र त्यानंतर कोकणात अवकाळी पाऊस बरसला. या अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष बागा, कोकणाती आंबा व काजू बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले. याशिवाय राज्यातील विविध भागात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.

यातच आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष बागा, गहू, कांदा आणि मका या नुकसान झालेल्या पिकांचा आढावा घेतला. यासंदर्भात त्यांनी माहिती देताना सांगितले, “मी काही शेतांमध्ये वयक्तिकरित्या परिस्थिती पाहिली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरात लवकर पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत द्यावी.”

Dr. Bharati Pawar
"..तर मविआला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा!"

पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी. पंचनामा करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरवावी. तसेच या संदर्भात राज्य सरकारने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी सुद्धा डॉ. भारती पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com