मोठी बातमी! राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद; ३१ हजार कोटींची थकबाकी; ‘या’ १५ जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी; शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा

राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील दीड लाख ते सव्वादोन लाखांपर्यंत शेतकरी सध्या थकबाकीत असल्याचेही त्या अहवालात नमूद आहे.
mantralay
mantralaysakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील दीड लाख ते सव्वादोन लाखांपर्यंत शेतकरी सध्या थकबाकीत असल्याचेही त्या अहवालात नमूद आहे. सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बॅंकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे.

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या वार्षिक नियोजनानुसार खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्जपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सिबिल पाहू नका, असेही आदेश आहेत. मात्र, बॅंकांमध्ये गेल्यावर शेतकऱ्यांचे सिबिल पाहिलेच जाते अशी वस्तुस्थिती आहे. खरीप सुरू होऊन महिना संपत आला, तरीदेखील बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतल्याचीही वस्तुस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्यामुळे अनेक शेतकरी त्या आशेवर असून त्यांनी अद्याप बॅंकांची थकबाकी भरलेली नाही. बॅंकांनी अनेकदा नोटिसा बजावून देखील शेतकरी बॅंकांमध्ये फिरकलेले नाहीत.

राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांपैकी पूर्वीच्या थकीत कर्जामुळे २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद झाले आहेत. राज्यातील सोलापूरसह १५ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे बॅंकांची सर्वाधिक थकबाकी आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे नुकसान, उसाची एकरकमी एफआरपी मिळत नाही, पिकांना हमीभाव नाही, अतिवृष्टी, महापूर अशा संकंटांमुळे शेतकरी बॅंकांची थकबाकी भरत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये थकबाकी जास्त

नगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, बुलढाणा, जालना, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, सोलापूर व यवतमाळ या १५ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांकडे बॅंकांची सर्वाधिक शेती कर्जाची थकबाकी आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात २७९० कोटी, सोलापूर जिल्ह्यात २६८१ कोटी आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे २२५६ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे.

शेतकरी अन् थकबाकीची स्थिती

  • एकूण शेतकरी

  • १,२९,३२,४८७

  • थकबाकीदार शेतकरी

  • २०,३७,२१०

  • एकूण थकीत रक्कम

  • ३१,२५३.५९ कोटी

राज्यात दररोज ७ शेतकरी आत्महत्या

राज्यात दरवर्षी अडीच हजारापेक्षा जास्त (सरासरी दररोज सात) शेतकरी आत्महत्या करतात, अशी वस्तुस्थिती आहे. त्यात छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नाशिक, नागपूर या विभागांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कोकण विभाग मात्र आत्महत्यामुक्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com