मोठी बातमी! फेब्रुवारी ते ११ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांचे २३९९ कोटींचे नुकसान; १९.४८ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात, तरी सरकारकडून मिळाली नाही दमडीचीही मदत

या वर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यातील अवकाळी आणि जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १९ लाख ४८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे १९.४८ लाख हेक्टरवरील पिकांचे अंदाजित दोन हजार ३९९ कोटींचे नुकसान झाले आहे. त्याची नोंद कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालात आहे.
mantralay
mantralaysakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : या वर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यातील अवकाळी आणि जून ते सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १९ लाख ४८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व अवकाळीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे १९.४८ लाख हेक्टरवरील पिकांचे अंदाजित दोन हजार ३९९ कोटींचे नुकसान झाले आहे. त्याची नोंद कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालात आहे.

राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना बंद केली. दुसरीकडे अतिवृष्टी, अवकाळी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाई देखील कमी केली आहे. राज्यातील २० लाख हेक्टरवरील पिके वाया गेलेली असताना सुद्धा शासनाकडून बाधित शेतकऱ्यांना एक रुपयाचीही भरपाई मिळालेली नाही. फेब्रुवारी ते जून या महिन्यात ४५० कोटी, जुलैमध्ये ११९ कोटी, ऑगस्टमध्ये १,७०० कोटी आणि ११ सप्टेंबरपर्यंत ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी, अतिवृष्टीने राज्यातील १७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. फळबागांसह मूग, उडीद, सोयाबीन, मका, गहू, कापूस, कांदा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड, नाशिक, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर यासह अन्य जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना आता पूर्वीप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेतच भरपाई मिळणार आहे.

महिनानिहाय नुकसानीचे क्षेत्र

  • फेब्रुवारी ते जून : २.९८ लाख हेक्टर

  • जुलै : १.३३ लाख हेक्टर

  • ऑगस्ट : १४.४५ लाख हेक्टर

  • सप्टेंबर : ७२ हजार हेक्टर

  • एकूण नुकसान : १९.४८ लाख हेक्टर

ऑगस्टमधील पंचनामेच अंतिम नाहीत

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला. याशिवाय उर्वरित २६ जिल्ह्यांमधील नऊ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. एका ऑगस्ट महिन्यातच राज्यात १४ लाख ४५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, पण पंचनामे अंतिम झाले नसल्याने अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकलेली नाही. काही जिल्ह्यांचे पंचनामे अपूर्ण आहेत तर अनेक जिल्ह्यांचे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहेत. तेथून अजूनही कृषी व महसूल विभागाकडे अंतिम अहवाल गेलेले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com