मोठी बातमी! मे महिन्यात संपूर्ण शहराला ५ दिवसाआड पाणी; उजनी उणे ३८ टक्के; महापालिकेकडून धरणात तिबार पंपिंगचे नियोजन

उजनी 5 दिवसाला 1 टक्के उणे जात असून उणे 50 टक्के झाल्यानंतर महापालिकेला त्याठिकाणी अडीच कोटींचा खर्च करून तिबार पंपिंग करावे लागणार आहे. सध्या उजनी उणे 38 टक्क्यांवर असून धरण दिवसेंदिवस रिकामे होत असल्याने मे महिन्यात शहराचा पाणीपुरवठा 5 दिवसाआड होणार आहे.
water supply
water supplyesakal

सोलापूर : उजनी धरण पाच दिवसाला एक टक्के उणे जात असून धरण उणे ५० टक्के झाल्यानंतर महापालिकेला त्याठिकाणी अडीच कोटींचा खर्च करून तिबार पंपिंग करावे लागणार आहे. सध्या उजनी उणे ३८ टक्क्यांवर असून धरण दिवसेंदिवस रिकामे होत असल्याने मे महिन्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड केला जाणार आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनी धरणावर अवलंबून असून धरणातील पाणी तळाशी गेल्याने सध्या महापालिकेने त्याठिकाणी दुबार पंपिंग सुरू केले आहे. २५ मार्च रोजी उजनीचे पाणी औजमध्ये पोचले, पण सध्या औजमध्ये अंदाजे ३० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा १० मे दरम्यान भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे.

तीव्र उन्हामुळे या आवर्तनासाठी धरणातून किमान सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. दुसरीकडे धरणावरील इतर पाणीपुरवठा योजनांसाठी देखील पाणी उपसा सुरू आहे. पाऊस जूनमध्ये समाधानकारक न झाल्यास सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे संभाव्य स्थितीचा अंदाज घेऊन मे महिन्यात संपूर्ण सोलापूर शहराचा पाच दिवसाआड होवू शकतो.

...तर एक दिवसाने पाणीपुरवठा लांबू शकतो

पाऊस लांबल्यास औजमधील पाणी दोन महिने पुरवावे लागणार आहे. मे महिन्यात वादळ-वाऱ्यांमुळे पंपिंगला देखील अडचणी येतात. त्यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे जाऊ शकतो.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका

धरणातील पाणी पाच दिवसाला एक टक्के कमी

तीव्र उन्हाळ्यामुळे होणारे बाष्पीभवन आणि धरणावरील ४२ पाणीपुरवठा योजना, यामुळे उजनीतील पाणीसाठा पाच दिवसाला एक टक्का कमी होत आहे. सध्या धरण उणे ३८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे सोलापूर शहरासह सर्वच पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी जूनमध्ये पाऊस जरुरी आहे.

पोलिसांच्या मदतीत समांतर जलवाहिनीचे काम

सोलापूर ते उजनी या ११० किलोमीटर समांतर जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सद्य:स्थितीत ७७ किमी काम पूर्ण झाले आहे. आता उजनी ते टेंभुर्णी या १५ किलोमीटरचे काम टेंभुर्णी पोलिसांची मदत घेऊन सुरू आहे. ऑक्टोबरपूर्वी जलवाहिनीचे काम १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com