मोठी बातमी! दिवाळी सुट्टीत शिक्षकांना करावा लागणार ‘टीईटी’चा अभ्यास; सुप्रिम कोर्टाकडून 2 वर्षाची मुदत; २३ नोव्हेंबरला पहिली संधी, पुढच्या वर्षी ‘करो किंवा मरो’ची स्थिती

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती असलेल्या ५२ वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. वर्षातून एकदाच टीईटी होत असल्याने आता २३ नोव्हेंबरला होणारी टीईटी या शिक्षकांसाठी पहिली संधी असणार आहे.
zp schools
zp schoolssakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्ती असलेल्या ५२ वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. वर्षातून एकदाच टीईटी होत असल्याने आता २३ नोव्हेंबरला होणारी टीईटी या शिक्षकांसाठी पहिली संधी असणार आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळीत सुट्टीत शिक्षकांना ‘टीईटी’चा अभ्यास करावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह देशातील सर्वच शिक्षकांसाठी (पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षक) टीईटी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली असून मुदतीनंतरही टीईटी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद आहे. त्यावर राज्य सरकार विधी व न्याय खात्याचा अभिप्राय घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करेल, असा विश्वास शिक्षकांना आहे.

मात्र, तशा हालचाली दिसत नसल्याने शिक्षकांनी आता टीईटी देण्याची मानसिकता बनवून परीक्षेची तयारी देखील सुरू केली आहे. शिक्षकांची यंदाची दिवाळी सुट्टी टीईटीच्या अभ्यासात जाईल, अशी स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या वर्गावरील फेब्रुवारी २०१३ पूर्वीचे, ज्यांचे वय ५२ वर्षांपर्यंत आहे असे सुमारे चार हजारांपर्यंत शिक्षक आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होईल कार्यवाही

सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी, ज्यांचे वय ५२ वर्षांपर्यंत आहे त्यांना टीईटी बंधनकारक केली आहे. त्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे. त्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना येतील, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

नोव्हेंबरनंतर राहणार एकच संधी

सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार ५२ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाची मुदत दिली आहे. वर्षातून एकदाच टीईटी घेतली जाते. आता २३ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा त्या शिक्षकांसाठी पहिली संधी असणाार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, ‘टीईटीचे नियोजन, अर्ज भरणे, अर्जांची छाननी, प्रश्नपत्रिका तयार करून त्याची छपाई, परीक्षा केंद्रांची निवड, परीक्षा, निकाल, त्यावरील हरकती व अंतिम निकाल, यासाठी किमान पाच ते सहा महिने जातात. त्यामुळे दरवर्षी एकदाच टीईटी घेतली जाते’. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार नोव्हेंबरची पहिली संधी आणि पुढच्या वर्षातील (२०२६) दुसऱ्या संधीत शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com