राज्याला मोठा दिलासा! १५ दिवसांतच २० धरणातील पाणीसाठा ५५ टक्क्यांवर; दुबार पेरणीचे संकट टळले; १.२३ कोटी हेक्टरवर पेरणी

पावसाळा सुरू होऊनही सुरवातीला ओढ दिलेल्या पावसाने ८ जुलैनंतर राज्यभर हजेरी लावली. त्यातून सद्य:स्थितीत राज्यातील २६ धरणांपैकी २० धरणांचा पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोचला आहे. कळिमोडे हे एकमेव धरण १०० टक्के भरले असून पाच धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत.
माणिकडोह (ता. जुन्नर)
माणिकडोह (ता. जुन्नर)sakal

सोलापूर : पावसाळा सुरू होऊनही सुरवातीला ओढ दिलेल्या पावसाने ८ जुलैनंतर राज्यभर हजेरी लावली. त्यातून सद्य:स्थितीत राज्यातील २६ धरणांपैकी २० धरणांचा पाणीसाठा ५५ टक्क्यांवर पोचला आहे. कळिमोडे हे एकमेव धरण १०० टक्के भरले असून पाच धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे पाणी टंचाई आणि पेरणी व दुबार पेरणीची चिंता दूर झाली आहे.

राज्यातील २६ धरणांपैकी सोलापूर जिल्ह्यातील उजनीच फक्त मायनस १० टक्क्यावर आहे. दौंडवरून १४ ते १६ हजारांचा विसर्ग धरणात येत असल्याने पुढील आठवड्यात धरण प्लसमध्ये येईल. दुसरीकडे नाझरे, विसापूर, घोड, पिंपळगाव जोगे ही धरणे अजूनही १० टक्यांच्यापुढे गेलेली नाहीत. माणिकडोह धरण ४० टक्के भरले आहे.

येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर ही धरणे सद्य:स्थितीत ५० ते ९८ टक्के भरली आहेत. आणखी दोन-अडीच महिने पावसाळा असल्याने राज्याच्या आपत्ती व्यवस्थान विभागाने भीमा खोरे पूननियंत्रण (जलसंपदा) विभागाला धरणातून एकदम पाणी सोडल्यास पुरस्थिती निर्माण होऊ शकते.

त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणीसाठ्यावर दररोज देखरेख ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी धरणातील पाणीपातळीची माहिती दररोज मागवून घेतली जात आहे. जेणेकरून वित्तहानी व जिवितहानी होणार नाही हा त्यामागील हेतू आहे.

सव्वाकोटी हेक्टरवर खरीपाची पेरणी

राज्यात एक कोटी ४२ लाख हेक्टर खरीप पिकांखालील क्षेत्र आहे. त्यापैकी एक कोटी २० लाख हेक्टरवरील पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने पेरण्यांना वेग आला असून धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाण्याची चिंता देखील मिटली आहे.

५० टक्क्यांवर भरलेली धरणे

धरण पाण्याची टक्केवारी

कळीमोडी १००

खडकवासला ९८.५३

चासकमान ९०.३१

येडगाव ८३.७३

वडज ५३.४९

डिंभे ५८.२४

चिल्हेवाडी ७९.१६

भामा आसखेड ६९.०६

वडीवळे ८६.९०

आंद्रा ७८.८२

पवना ७७.९२

मुळशी ७२.२७

टेमघर ५२.०३

वरसगाव ६९.३७

पानशेत ७६.७१

गुंजवणी ६५.१३

निरा देवधर ७९.०७

भाटघर ६३.१६

वीर ७२.५९

उजनीची प्लसच्या दिशेने वाटचाल
लोणावळा, भीमाशंकर, खडकवासला धरण साखळीसह उजनीच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनी धरणात दौंडवरून येणारा पाण्याचा विसर्ग २२ हजार क्युसेकपर्यंत कायम आहे. त्यामुळे सध्या उजनी धरण उणे नऊ टक्क्यांवर (-४.८७ टीएमसी) आले आहे. असाच विसर्ग राहिल्यास पुढील पाच दिवसांत धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता ५९ टीएमसी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com