मुंबई : "महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जी वैयक्तिक खालची पातळी गाठली ती पातळी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलाटणी देणारी ठरली. मग यामागचे भीष्म पितामह कुणाला म्हणता येईल, तर ते आहेत उद्धव ठाकरे" असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांना बोचरी टीका केली आहे. "आम्ही सरकार चालवलं. अर्ध्या रात्री उध्दवजींनी कॉल केला तरी त्यांच्या सगळ्या गोष्टींचा मान राखला. त्यांना कधीच नाही म्हटलो नाही. मान अपमानाच्या गोष्टी न करता मी स्वत: मातोश्रीवर जायचो. तरीपण त्यांनी आमच्याशी युती तोडली" असं ते या कार्यक्रमात म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी काल आपल्या सभेत "आत्तापर्यंताच सर्वांत कलंकीत मुख्यमंत्री" म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं असून "माझे वडील आणि माझा कॅमेरा हेच उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व अशा शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.