Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Udayanraje Bhosale Exclusive Interview : उदयनराजे भोसलेंची साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? याबद्दल खुद्द उदयनराजे भोसले यांनीच माहिती दिली आहे.
Udayanraje Bhosale Exclusive Interview
Udayanraje Bhosale Exclusive Interview

Udayanraje Bhosale Exclusive Interview : लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या देशभरात पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. यादरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र साताऱ्यातून त्यांची उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? याबद्दल राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. मात्र आता याबद्दल खुद्द उदयनराजे भोसले यांनीच माहिती दिली आहे.

सकाळ माध्यमसमुहाचे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत याबद्दल उदयनराजेंना प्रश्न विचारण्यात आला होता. तुमची उमेदवारी जाहीर होण्यासाठी वेळ लागत होता आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी साताऱ्यात सभा घेतात, याबद्दल विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले की, ही काही महाराष्ट्रापुरती मर्यादीत निवडणूक (लोकसभा निवडणूक २०२४) नाही. संपूर्ण देशात निवडणुका होत असताना जर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणुकीला सामोरा जात असता, तर पहिल्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली असती.

पण जेव्हा मित्रपक्ष, बाकीच्या संघटना सोबत असतात तेव्हा चर्चेत थोडा वेळ जात असतो. भाजप असो किंवा इतर पक्षांना आपला पक्ष वाढला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे पहिला टप्प्यात ज्या निवडणुका आहेत तेथील उमेदवार पहिल्यांदा जाहीर झाले, फेजनुसार उमेदवार जाहीर होत असल्याने उशीर असा काही झाला नाही. प्रोसेसनुसार उमेदवारी जाहीर झाली, असे उदयनराजे यांनी सांगितले.

संपूर्ण मुलाखत पाहा येथे >>>>

Udayanraje Bhosale Exclusive Interview
Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

१९९५ पासून तुम्ही राजकारणात आहात, तुम्हाला काय बदल जाणवतात? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, बदल तर झाला आहेच, कारण तेव्हा मीडिया इतका हायटेक नव्हता. सोशल मीडिया हा प्रकार पण नव्हता. त्यामुळे तेव्हा आणि आता जमीन आस्मानचा फरक आहे. तेव्हाची आणि आताच्या पिढीच्या विचार पद्धतीत बदल आहे. तेव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करायचे आता तरुण पिढी संपूर्ण विकासाकडे बघत आहे, त्यांना एक्सपोजर जास्त आहे. आता स्पर्धा देखील वाढली आहे त्यामुळे आताची पिढी त्यांचे ध्येय ठरवते आणि ती पूर्ण करण्यासाठी विकासाच्या दिशेने विचार करते असे उदयन राजे म्हणाले. सर्व बाजूने विचार केला तर तुलनाच होऊ शकत नाही असेही उदयनराजे म्हणाले.

Udayanraje Bhosale Exclusive Interview
कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com