महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतराचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. आता अहमदनगरचेही नामकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी नामांतराबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसंच आता अहमदनगरचंही नामांतर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वास पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, "अहमदनगरचे अहिल्या नगर असे नामकरण करावे, अशी अहिल्यादेवी होळकर समर्थकांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय घेतला जाईल, असा मला विश्वास आहे."
राज्य शासनाच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता औरंगाबादचं नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' तर उस्मानाबादचं नामांतर 'धाराशीव' असं झालं आहे. केंद्राच्या आदेशानुसार, औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याचं नाव कायम राहणार आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं नाव धाराशीव असं बदलण्यात आलं आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.