मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीपूर्वी वातावरण तापताना दिसत आहे. दरम्यान नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदान करता यावं अशी मागणी करणारी याचिका केली होती. या निवडणुकीसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आज निकाल दिला. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना पुन्हा दणका देत विधानपरिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी होणार आहेत. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्येक पक्षाला विधानपरिषद निवडणूकीत स्वतःची इभ्रत राखायची आहे, स्वत:चे उमेदवार निवडून आणायच्या भूमिकेत असेल असे दरेकर यावेळी म्हणाले आहेत.
जर एखाद्या पक्षाचा एखादा उमेदवार पडला तर पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणाचेही आणायचे पण आपले दोन निवडून आणायचे या भूमिकेत राष्ट्रवादी पक्ष दिसतो, यातूनच शिवसेनेला पाठिंबा देणार्या अपक्ष आमदारांना चुचकारण्याचा तसेच प्रलोभने देण्याचा प्रयत्न असू शकतो, असे दरेकर म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना निवडणूकीत मतदान करता येणार नसल्याने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या विधानपरिषदेच्या निवडणूकीत गुप्त पद्धतीने मतदान असल्याने अनेकांना शेवटच्या क्षणी धक्का बसू शकतो. दरम्यान यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत देखील सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता विधान परिषदेचं समीकरण देखील राष्ट्रवादीला नव्याने मांडावं लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.