महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करणार? ‘हे’ आहेत मोठे संकेत

BJP to form government in Maharashtra
BJP to form government in MaharashtraBJP to form government in Maharashtra

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) ढवळून निघाले आहे. रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सरकारमधील नेते या बंडामध्ये भाजपचा (BJP) हात असल्याचे म्हणत आहे. मात्र, सरकार स्थापन करण्याबाबत भाजप अधिकृतपणे काहीही बोलायला तयार नाही. मात्र, असे काही संकेत मिळत आहे, ज्यावरून भाजप येत्या काही दिवसांत सरकार स्थापन करेल असे दिसून येत आहे. (BJP to form government in Maharashtra)

बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि राज्य सरकार यांच्यातील लढा आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट दुसरा पर्याय शोध आहे. शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला शिवसेना व बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरता येणार नाही. अशा परिस्थितीत शिंदे गटातील ३८ आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात.

BJP to form government in Maharashtra
शिवसैनिकाचे वादग्रस्त विधान, बंडखोर आमदारांच्या बायकांबद्दल म्हणाले...

एकनाथ शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्याशी या मुद्द्यावर दोनदा फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे. बंडखोर आमदार राज ठाकरेंसोबत गेल्यास मनसे व भाजप मिळून महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन करू शकतात, असे मानले जात आहे. तसेही शिवसेनेचे नेते बंडखोर आमदारांसाठी कोणते पर्याय उरले आहेत, हे सांगत आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राची राजकीय लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शिंदे गटाने न्यायालयात दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यात शिंदे गटाने १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत उपसभापतींकडून सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील चंद्र प्रकाश पांडे म्हणतात की, न्यायालय या प्रकरणी मोठा निर्णय देऊ शकते. न्यायालय उद्धव ठाकरे गटाला बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकते. विधानसभा उपसभापतींच्या कारवाईलाही स्थगिती मिळू शकते. दोन्ही बाबतीत भाजपला फायदा होईल.

BJP to form government in Maharashtra
उज्ज्वल निकम यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य; म्हणाले...

आम्ही अजून दोन ते तीन दिवस विरोधात आहे, असे रविवारी भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याकडे सरकार स्थापनेचे संकेत मानले जात आहे. राजकीय उलथापालथ दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बंडखोर आमदारांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी गुजरातमधील वडोदरा येथे भेट झाली. बैठकीत शिंदे गटाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. अमित शहा देखील दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी सायंकाळी उशिरा वडोदरा येथे पोहोचले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com