औरंगाबाद ऑटो कंपन्यांमध्ये 'बूम' 

औरंगाबाद ऑटो कंपन्यांमध्ये 'बूम' 

औरंगाबाद : दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याने औरंगाबाद ऑटो जगतात "बूम' पाहायला मिळते आहे. दुचाकींच्या उत्पादनातील वाढीसह आता महिन्याकाठी एक लाखापर्यंत रिक्षा निर्मिती करण्याइतपत क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बजाजसह देशातील अन्य ऑटो कंपन्यांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या औरंगाबादेतील लहान-मोठ्या उद्योगांनी सुमारे पाच हजार कोटी खर्चून आपली क्षमता वाढविली आहे. 

देशात क्वचितच अशी कंपनी असेल की, ज्यांच्या वाहन उत्पादनात "मेड इन औरंगाबाद' असा भाग लागत नाही. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची मागणी वाढली आहे. औरंगाबादेतील ऑटो उद्योगांनाही त्यानुसार आपल्या क्षमतांमध्ये बदल करावे लागतील. 

देशातील आघाडीचा दुचाकी आणि रिक्षा निर्मिती उद्योग बजाज ऑटोने त्यांची निर्मिती क्षमता वाढवली आहे. महिन्याकाठी 25 हजार रिक्षा तयार करणाऱ्या "बजाज'ने आता प्रतिमहिना 73 हजार रिक्षांचे उत्पादन सुरू केले आहे. डिसेंबर 2019 पर्यंत हा उद्योग महिन्याला एक लाख रिक्षा निर्माण करणार आहे. हे नवे ध्येय लक्षात ठेवून बजाज आणि देशातील दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या "टियर वन'पासून सर्वच उत्पादकांनी आपली क्षमता उंचावली आहे. 

यासाठी शहरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यांनी सुमारे पाच हजार कोटींची गुंतवणूक करून बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी दमदार वाटचाल सुरू केली आहे. 

या वाढीव मागणीचे आव्हान पेलण्यासाठी मोठ्या उद्योगांसह सर्वच कंपन्यांनी आपली क्षमता वाढविण्यासाठी अंदाजे पाच हजार कोटी खर्च केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. 

- उमेश दाशरथी, व्यवस्थापकीय संचालक, ऋचा इंजिनिअरिंग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com