रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केले.
खारघर येथे आयोजित जाहीरसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, मागील पाच वर्षांत अनेक जेटी तट बनविण्यात आले. मच्छिमारांच्या दृष्टीने सरकारकडून काम केले जात आहे. समुद्री तटाला प्लास्टिकमुक्त राखण्यासाठी सहकार्याची गरज आहे. केंद्र सरकार मच्छिमारांच्या दृष्टीने काम करत आहे. त्यासंदर्भात केंद्रात स्वतंत्र विभागही तयार करण्यात आला आहे.
मतदानाचा हक्क बजावा
21 ऑक्टोबरला तुमच्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे. रविवार-सोमवार ही जोडून सुट्टी आली आहे. त्या दिवशी जाऊन मतदानाचा हक्क बजावावा. लोकसभेपेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान व्हावे. सर्व जुने रेकॉर्ड तुटायला हवेत. महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.
'पुन्हा आणू या आपले सरकार'
पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थितांमध्ये घोषणा सुरु केली. त्यांनी स्वत: मराठीत 'पुन्हा आणू या' असे म्हटल्यावर उपस्थितांकडून 'आपले सरकार' म्हटले जात होते.
महाराष्ट्रात 'देवेंद्र'ला पुन्हा बसवा
लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मतं देऊन तुम्ही दिल्लीत 'नरेंद्र'ला पुन्हा बसवलं, आता महाराष्ट्रात 'देवेंद्र'ला पुन्हा बसवा, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.