सोलापुरातील वर्दळीची ठिकाणे पोलिसांच्या नजरेआड! रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅण्डमधील प्रवासी अन्‌ बाजार समितीतील शेतकरी, शेतमाल असुरक्षित

मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५ हजारांहून अधिक प्रवासी बसगाड्यांमधून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरूनही दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा होते. बाजार समितीत दररोज आठ- दहा कोटींची उलाढाल असते. तरी, या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे कायमस्वरूपी लक्ष नसल्याची वस्तुस्थिती आहे.
Solapur city ST bus Stand
Solapur city ST bus Standsakal
Updated on

सोलापूर : येथील मुख्य बस स्थानकावरून दररोज एक हजारांपर्यंत गाड्या ये-जा करतात. दररोज अंदाजे १५ हजारांहून अधिक प्रवासी येथून विविध बसगाड्यांमधून प्रवास करतात. रेल्वे स्थानकावरूनही दररोज ३० ते ३५ हजार प्रवाशांची ये-जा होते. बाजार समितीत दररोज आठ ते दहा कोटींची उलाढाल असते. तरीदेखील, या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचे कायमस्वरूपी लक्ष नसल्याची वस्तुस्थिती आहे. बाजार समितीतून वाहने, शेतमालाची चोरी, एसटी स्टॅण्डवरुन प्रवाशांची रोकड, दागिने चोरी व रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकांची मनमानी चालते.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मुख्य विभागीय बस स्थानक आहे. तेथून दररोज एक हजार ते अकराशे बसगाड्या मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ये-जा करतात. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांची बॅग, खिशातील मोबाईल, गळ्यातील दागिने लंपास करतात. या प्रकरणी नेहमीच फौजदार चावडी पोलिसांत फिर्यादी दाखल होतात. रेल्वे स्थानक परिसरातील पोलिस चौकी बंद झाल्याने त्याठिकाणी रेल्वेतून उतरून येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचीही स्थिती आहे.

अनेकदा त्याठिकाणी प्रवासी व रिक्षा चालकांमध्ये तक्रारी होतात. कोणत्या रिक्षा त्याठिकाणी रात्री थांबतात, याची कोणतीही नोंद पोलिसांकडे होत नाही. दुसरीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज विविध जिल्ह्यातून दहा हजारांवर शेतकरी शेतमाल घेऊन त्या ठिकाणी येतात. दररोजची उलाढाल आठ ते दहा कोटी रुपयांची आहे. त्याठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या दुचाकी, शेतमाल चोरीला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याठिकाणी पेट्रोलिंग वाढविणे किंवा कायमस्वरूपी दोन-तीन कर्मचारी तेथे नेमणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

निश्चितपणे पोलिसांचे काही मनुष्यबळ देण्याचे नियोजन

बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल असतो, रेल्वे स्थानक व एसटी स्टॅण्डवरुनही दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. त्याठिकाणी निश्चितपणे पोलिसांचे काही मनुष्यबळ देण्याचे नियोजन आहे.

- विजय कबाडे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

मागणीचा सकारात्मक विचार करावा एवढीच माफक अपेक्षा

बाजार समितीत दररोज दहा हजारांपर्यंत शेतकरी त्यांचा शेतमाल घेऊन येतात. दररोज आठ ते दहा कोटी रुपयांपर्यंत उलाढाल बाजार समितीची आहे. याठिकाणी केवळ बाजार समितीसाठी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी काही पोलिसांचे मनुष्यबळ द्यावे, असा पत्रव्यवहार यापूर्वीच करण्यात आला आहे. त्या मागणीचा सकारात्मक विचार करावा एवढीच माफक अपेक्षा आहे.

- मोहन निंबाळकर, प्रशासक, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

वर्दळीच्या ठिकाणची सद्य:स्थिती

  • (सोलापूर बाजार समिती)

  • दररोज येणारे शेतकरी

  • १० ते ११ हजार

  • दररोजची उलाढाल

  • ८ ते ९ कोटी रुपये

  • कायमस्वरूपी पोलिस

  • ०००

----------------------------------------------------------------

(बस स्थानक)

  • दररोज ये-जा करणाऱ्या बस

  • १००० ते ११००

  • दररोजचे प्रवासी

  • १२ ते १५ हजार

  • सुरक्षेसाठी पोलिस

-----------------------------------------------------------

  • (रेल्वे स्टेशन)

  • दररोजच्या रेल्वे गाड्या

  • ७०

  • दररोजचे प्रवासी

  • २५ ते ३० हजार

  • पोलिस चौकी

  • ०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com