मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील कुलगुरुंची (Vice Chancellors) निवड आता राज्य शासनाच्या (State Government) शिफारसीनुसार होणार आहे. या नियुक्त्यांच्या थेट निवडीचा अधिकार राज्यपालांकडून (Governor) काढून घेण्यात येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याला बुधवारी राज्य मंत्रीमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत मंजुरी देण्यात आली. Cabinet Decision state government will select vice chancellors of universities
मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार, राज्यातील कुलगुरुंची नियुक्ती थेट राज्यपालांना करता येणार नाही. राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरु नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, कुलगुरुंच्या नियुक्त्यांसाठी प्र-कुलपती हे नवं पद निर्माण केलं जाणार आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या प्र-कुलपतीपदाचे अधिकार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे असतील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.