पुढील निवडणुकीत परिवर्तन अटळ - पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

मुंबई - २०१९ मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होणार असून, ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्या हाती राहणार नाही. २०१९ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आपण कधीही नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

शरद पवार म्हणाले की, २००४ मध्ये ज्या प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, तीच परिस्थिती २०१९ मध्ये असणार आहे. निवडणुकीनंतर सर्व पक्ष डॉ. मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते पंतप्रधान झाले. २००४ मध्ये जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती २०१९ मध्ये कायम राहणार आहे. नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व भाजप नेते अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे नाही. देशात बदल होत असून, आगामी निवडणुकीत देशातील जनतेला बदल पाहायचा आहे. देशात महायुतीचे सरकार येईल अशी शक्‍यता आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप मोदी विरुद्ध राहुल गांधी असा प्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहे; पण तसे होणार नाही. कारण, सरकारचे नेतृत्व कोण करेल, हे निवडणुकीनंतरच ठरेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधानपदाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी खुलासा केला आहे. काँग्रेसला देशात सत्तांतर घडवून आणायचे आहे. त्यामुळे काँग्रेस पंतप्रधानपदाच्या अटीवर अडून बसलेली दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

महाआघाडीची चर्चा नाही
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्याशी महाआघाडी करण्याची चर्चा झालेली नाही, मात्र वेगवेगळ्या राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपविरोधात एकत्र येतील. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असेल, अशी शक्‍यता पवार यांनी वर्तविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com