

औद्योगिक सुरक्षेबाबत कडक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही. सुपा (पारनेर) एमआयडीसीमध्ये 'टॉरल इंडिया'च्या अत्याधुनिक प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी सांगितले की, उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी.