

Fadnavis Delhi meeting sparks talks on NCP merger speculation
Esakal
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल सोमवारी लागले. यातही पुन्हा एकदा महायुतीने मोठं यश मिळवलंय. जिल्हा परिषदेच्या निकालनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नविन यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.