अजितदादांचं जाणं अविश्वसनिय! दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची भावना

CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी हानी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्याच्या कानाकोपऱ्याची माहिती असणारा नेता गमावल्याचं फडणवीस म्हणाले.
Fadnavis Reaction on Ajit Pawar death in plane crash

Fadnavis Reaction on Ajit Pawar death in plane crash

Esakal

Updated on

Devendra Fadnavis On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं हे अविश्वसनिय आहे. मी एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या. राज्यात आज शासकीय सुट्टी आणि तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दु:खद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरंतर अजित पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित पवार यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com