मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख यांच्या अयोध्या दौऱ्यावरून कॉंग्रेस आणि शिवसेनेत आज जुंपली. दळभद्री सरकारमधून आधी बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला असता, शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले. आगामी निवडणुकीनंतर हिमालयात जाण्याची तयारी करा, असे उत्तर शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांनी दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले की, शिवसेनेने आजवर 235 वेळा सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे दिले. पण शेवटपर्यंत सत्ता सोडली नाही. हे सरकार लोकविरोधी आहे, शेतकरीविरोधी आहे, असे वाटत असेल तर शिवसेनेने तात्काळ या सरकारमधून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. यावर राधाकृष्ण विखे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.
उद्धव ठाकरे यांनी काय करावे आणि हिंदुत्वाचे कार्य त्यांनी कसे करावे, सरकारमध्ये राहावे की राहू नये, याचे मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांनी आपली राजकीय आणि बौद्धिक उंची लक्षात घेऊन त्यांनी राहुल गांधी यांनी कैलास मानसरोवरमधून आणलेले भस्म आपल्या कपाळावर लावून घ्यावे आणि आगामी निवडणुकीनंतर हिमालयात जाण्याची तयारी करावी, असे मनीषा कायंदे म्हणाल्या.
|