मुंबई : राज्यात कोरोना बधितांच्या मृत्यूचा आकडा वाढला असून आज 33 रुग्ज दगावले.शनिवारी 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. आज 832 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,34,444 झाली आहे.
राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1,40,941 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 8,193 इतकी आहे. आज 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,81,640 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.7 % एवढे झाले आहे.
कोल्हापूर,औरंगाबाद,लातूर,अकोला,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 20,नाशिक 10,पुणे 3 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 85,874 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1043 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.