राज्यात दिवसभरात 5539 नवे रुग्ण, तर 187 रुग्णांचा मृत्यू

Corona
Corona

मुंबई : आज राज्यात 187 कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. नागपूर मंडळात एक ही मृत्यू झाला नाही तर अकोला मंडळात केवळ एकाच मृत्यूची नोंद झाली. औरंगाबाद आणि पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तिथे अनुक्रमे 71 आणि 56 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 11, नाशिक 13,कोल्हापूर 30, लातूर 5 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.1 % इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,33,717 वर पोहोचला आहे.

Corona
JEE Main 2021 परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पहा निकाल
Corona
राज्यात शाळा 'या' तारखेपासून सुरु; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

राज्यात आज दिवसभरात 5,539 नवीन रुग्णांची नोंद झाली.करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,41,759 झाली आहे.राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या काहीशी वाढून 74,483 इतकी झाली. आज दिवसभरात 5,859 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,30,137 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.66 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,91,72,531 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,41,759 (12.9 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,35,516 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,837 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com