राज्यात शाळा 'या' तारखेपासून सुरु; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

Education Minister Varsha Gaikwad
Education Minister Varsha Gaikwadesakal

मुंबई: सध्या राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आहे. दुसरी लाट ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल”, आत्तापर्यंत कोरोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Education Minister Varsha Gaikwad
नरेंद्र मोदी, अरुण जेटली स्टेडीयम ही नावे बदला; काँग्रेसची मागणी

५ वी ते ८ वीच्या शाळा होणार सुरु

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५ वी ते ८वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com