पीकविमा योजना हा घोटाळाच : उद्धव ठाकरे

crop insurance is a Fraud says Uddhav Thackeray
crop insurance is a Fraud says Uddhav Thackeray

मुंबई : पीकविम्यात शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत का, पीकविमा योजना हा एक घोटाळा आहे. त्याचा फायदा शेतकऱअयांना होत नाही. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळालेच पाहिजेत असे म्हणत शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. 

पीकविमा योजना हा एक घोटाळा असून शिवसेनेच्या प्रयत्नांनंतर पीकविम्या कंपन्या ताळावर आल्या असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी मुंबईत सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

शिवसेनेने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 10 लाख शेतकऱ्यांना 960 कोटी भरपाई मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी तसेच पीकविमा कंपन्यांनी शेतकऱअयांचे घेतलेले पैसे परत करावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असे आश्वासनही त्यांनी दिले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com