

Mumbai-Sawantwadi Railway
ESakal
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना बाप्पाच्या आगमनाची राज्यभरात जोरदार तयारी सुरु आहे. या सणाच्या कालावधीत गणरायाच्या आगमनासाठी अनेकजण आपल्या गावी जातात, त्यामध्ये कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. प्रवाशांची मोठी संख्या पाहता रेल्वे प्रशासनासह एसटी महामंडळाकडून जादा आणि विशेष गाड्या सोडल्या जातात. अशातच मुंबई-सावंतवाडी दरम्यान दैनिक एक्सप्रेस सुरु केली आहे.