बॅंकांमध्ये अडकल्या ठेवी; शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिक अडचणीत

बॅंकांमध्ये अडकल्या ठेवी; शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिक अडचणीत

पुणे : आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या राज्यातील बॅंकांमध्ये सहकारी पतसंस्थांच्या सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे सध्या शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, त्यांच्या ठेवीदारांनाही स्वतः:चे पैसे परत मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.

पतसंस्थांमध्ये बहुतांश नोकरदार, किरकोळ विक्रेते, व्यावसायिक, फेरीवाले, हमाल यांच्यासह सामान्य ठेवीदार पैसे ठेवतात. काही पतसंस्था चालकांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप केले. त्यामुळे काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. यासोबतच गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून आर्थिक निर्बंध लादण्यात आलेल्या काही बॅंकांमुळे पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्यामुळे पतसंस्थांमधील सामान्य ठेवीदारही अडचणीत आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे आणि पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन सहकारमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी बॅंकांमध्ये शेतकरी कर्जमाफीचे पैसे जमा झाल्यानंतर पतसंस्थांना ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पतसंस्थांना अद्याप ठेवी परत मिळालेल्या नाहीत.

बॅंकांमध्ये अडकल्या ठेवी; शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिक अडचणीत
महाराष्ट्रात 'डेल्टा+' ची लागण झालेल्या एकाचा मृत्यू

अशी आहे स्थिती

- रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लादलेल्या पंजाब ॲण्ड महाराष्ट्र (पीएमसी) बॅंकेत पतसंस्थांच्या सुमारे ३५० कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत - त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील १९० पतसंस्थांचा समावेश

- पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत २६ सहकारी पतसंस्थांच्या ८० कोटींच्या ठेवी अडकल्या

- नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत पतसंस्थांच्या सुमारे साडेतीनशे कोटींच्या ठेवी आणि भागभांडवल अडकले

- सांगली जिल्ह्यातील वसंतदादा शेतकरी बॅंकेतही पतसंस्थांच्या सुमारे दीडशे कोटींच्या ठेवी अडकल्या

- कुरुंदवाडमधील एस. के. पाटील बॅंक, सातभाई मर्चंट बॅंकेत ठेवी अडकल्या

- बीड जिल्हा मध्यवर्ती आणि बुलडाणा जिल्हा बॅंकेतही पतसंस्थांच्या ठेवी अडकल्या

बॅंकांमध्ये अडकल्या ठेवी; शंभरहून अधिक पतसंस्था आर्थिक अडचणीत
अस्तित्वात नसलेल्या रिपोर्टवरून केजरीवालांना शिव्या- सिसोदिया

निर्बंध लादण्यात आलेल्या बॅंकांवर सहकार खात्याचे अधिकारी प्रशासक किंवा अवसायक म्हणून पूर्णवेळ देऊ शकत नाहीत. लोकसेवा सहकारी बॅंकेत पतसंस्थांचे पैसे अडकले होते. परंतु पदाधिकाऱ्यांवर विश्वास आणि प्रशासकीय मंडळावर नेमण्यात आलेल्या बॅंक आणि पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांमुळे ठेवीदारांना ८५ टक्के ठेवी परत मिळणे शक्य झाले. त्यामुळे सहकारी बॅंकांवर नेमण्यात येणाऱ्या प्रशासकीय किंवा अवसायक मंडळात ठेवीदार आणि पतसंस्थांचे प्रतिनिधी असावेत.

- काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com