पंधरा दिवसांत ओबीसी प्रभागांची निश्चिती! आरक्षणाची ‘अशी’ असेल प्रक्रिया

ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २०) दिला. त्यानंतर आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रभागनिहाय आरक्षणानुसार सदस्य संख्या निश्चित होईल. त्यानंतर पुन्हा नव्याने सर्वच प्रभागांची आरक्षण सोडत निघून त्याचे जाहीर प्रसिध्दीकरण होईल. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेसह महापालिका आणि ११ पंचायत समित्या व ११ नगरपरिषदा, एका नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे.
5 State Assembly Election Impact on Maharashtra
5 State Assembly Election Impact on MaharashtraSAKAL

सोलापूर : ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. २०) दिला. त्यानंतर आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रभागनिहाय आरक्षणानुसार सदस्य संख्या निश्चित होईल. त्यानंतर पुन्हा नव्याने सर्वच प्रभागांची आरक्षण सोडत निघून त्याचे जाहीर प्रसिध्दीकरण होईल. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेसह महापालिका आणि ११ पंचायत समित्या व ११ नगरपरिषदा, एका नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला निवडणुका पुढे ढकलण्याचा स्वतंत्र अध्यादेश काढावा लागला होता. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी बांठिया आयोग नेमला आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ओबीसींचा राजकीय मागासलेपणाचा डेटा संकलित केला. त्या आयोगाचा अहवाल न्यायालयाने स्वीकारल्याने आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळले आहे. पण, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली होती. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी काळात निवडणूका होणाऱ्या सर्व ठिकाणी आता नव्याने आरक्षण (प्रक्रिया) सोडत काढली जाणार आहे. ज्यांची प्रभागरचना अंतिम झालेली नाही, त्यांना पहिल्यांदा ती प्रक्रिया पार पाडावी लागेल. त्यामुळे मागील आरक्षण सोडतीत ज्यांची संधी हुकली त्यांच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहेत. प्रभागरचना तशीच राहील, पण संपूर्ण आरक्षण प्रक्रिया नव्याने होणार आहे.

जिल्ह्यात ‘या’ स्वराज्य संस्थांची निवडणूक
सोलापूर जिल्हा परिषदेवर २१ मार्च रोजी तर महापालिकेवर ८ मार्च रोजी प्रशासक आला. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती (एकूण ११ पंचायत समित्या) आणि अनगर नगरपंचायतीसह अक्कलकोट, मैंदर्गी, दूधनी, सांगोला, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट, मंगळवेढा व बार्शी या नगरपरिषदांची निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यात महापालिकेतील ११३ नगरसेवकांमध्ये (२७ टक्के) ३१ नगरसेवक ओबीसींचे असतील. तसेच जिल्हा परिषदेच्या ७७ सदस्यांमध्येही २७ टक्क्यांच्या प्रमाणात ओबीसींना संधी मिळणार आहे.

  • आरक्षणाचे टप्पे...

    - पहिल्यांदा प्रभागनिहाय सदस्य संख्या होईल निश्चित

    - पुन्हा नव्याने निघणार प्रभागनिहाय आरक्षण सोडत

    - प्रभाग रचनेनुसार प्रभागनिहाय निघालेल्या आरक्षणाचे जाहीर प्रसिध्दीकरण

    -१५ दिवसांत आरक्षणाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यावर निवडणुकीचा जाहीर होणार कार्यक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com