शेतकऱ्यांचं ऐकण्यासाठी व्यवस्था नाही; फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस Media Gallery
Summary

तीन पक्षांची युती अनैसर्गिक असल्याचं ते म्हणाले. गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी तीन पक्षांची तुलना त्यांनी केली.

मुंबई - मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शेतकऱी सुभाष जाधव यांच्या मृत्यूवर फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणतीच व्यवस्था उरली नाही. अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग अशा होत आहेत की त्यांना गरीब लोकांकडे पाहण्यासाठी वेळ नाही.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेत नाही. आत्महत्यांचे प्रमाण राज्यात वाढत आहे. मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला हवा. त्यांच्या कुटुंबांना मदत करायला हवी असं फडणवीस म्हणाले. मुंबईत फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकाही केली. तीन पक्षांची युती अनैसर्गिक असल्याचं ते म्हणाले. गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांशी तीन पक्षांची तुलना त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस
'समजुतीने वागलो नाही तर धोका अटळ', मुख्यमंत्र्यांची दहीहंडी पथकांसोबत बैठक

फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे लोक हे अनैसर्गिक युती करून एकत्र आले आहेत. विचारसरणी, विचार आणि गव्हर्नन्स नाही, फक्त सत्तेला चिकटलेले हे लोक आहेत. जसे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तसे हे सत्तेला चिकटलेले तीन पक्षा आहेत. सत्तेत वाटा मिळाला नाही की आरडाओरड होते. वाटा मिळताच बंड करणारे थंड होतात असा टोलाही त्यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com