नागपूरः नागपूरमध्ये आज आयोजित सावरकर गौरव यात्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाज केली. यावेळी बोलताना फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या टीकेला आणखी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं.
सावरकरांवर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही सडक्या मेंदूचे लोक सावरकरांना माफीवीर म्हणतात. परंतु सावरकरांना चांगलं माहिती होतं इंग्रज त्यांना सोडणार नाहीत. त्यांनी इतर कैद्यांच्या सुटकेसाठी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं. यासंबंधी स्वतः महात्मा गांधी यांनी सावरकरांच्या भावाला पत्र लिहून सावकरांना इंग्रजांना पत्र लिहिण्याचा सल्ला दिल्याचं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, तुमचं सरकार आहे. सावरकरांविषयी आदर आहे तर मग त्यांना भारतरत्न देऊन दाखवा. त्यावर फडणवीस म्हणाले की, सावरकर हे आमच्यासाठी भारतरत्न आहेत. त्यांना भारतरत्न देण्यात येणारच आहे. परंतु, तुमच्यासारख्या कुचक्या मेंदूच्या लोकांना सुधारू, मगच भारतरत्न देऊ, असं विधान फडणवीसांनी केलं.
फडणवीस पुढं म्हणाले की, मै फडतून नहीं काडतूस हूं मैं... झुकेगा नहीं साला घुसेगा..मागचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जायचे तेव्हा कुठे उभे असायचे कुठे बसायचे काहीही कळायचं नाही. आताच्या पंतप्रधानांना भेटण्यासाठी जो बायडेनही रांगेत उभे असतात. देशाचा मान जगभरात उंचावल्याचं फडणवीस म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.