
बुलढाणा : राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह आहे, मात्र, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांची 'दिवाळी कडू'च होणार असून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसोबत ठेचा भाकरी घाऊन दिवाळी साजरी केली आहे.
(Diwali Celebration With Farmer and Thecha Bhakri)
"राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, शेतकऱ्यांनी पिकवलं तरंच आम्ही खातो पण आज तो घरात उपाशी असेल आणि आपण मजा करत असू, गोडधोड खात असू हे मला मान्य नाही. मला शेतकऱ्यांबाबत आस्था, प्रेमभावना आहे, तर तो आज घरात चटणी भाकरी खात असेल तर आम्हीपण चटणी भाकरी खाणार असा निर्णय मी घेतला आहे म्हणून मी आज त्यांच्यासोबत ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत आहे" असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं.
या दिवळीत शेतकरी घरी उपाशी मरत असताना आम्ही कोणत्याही प्रकारची आतिषबाजी करणार नाही. ही कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी नाही तर कुणाच्या विरोधातील आंदोलन नाही, फक्त शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या भावनेसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेचा भाकरी खाऊन दिवाळी साजरी करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.