'फसव्या "अच्छे दिन'च्या धुंदीत प्रक्षोभ संपला'

'फसव्या "अच्छे दिन'च्या धुंदीत प्रक्षोभ संपला'

 "सकाळ'चे सावंत यांना "जगन फडणीस शोधपत्रकारिता पुरस्कार' 
कोल्हापूर - भाजपच्या सत्ताकाळात अनेक कंपन्या बंद पडल्या, रुपयाचे मूल्य घसरले, जीवनावश्‍यक वस्तूंचे दर भडकले, तरीही आपल्याला राग येत नाही, त्याविरोधात आपण प्रक्षोभ व्यक्त करत नाही. कारण "अच्छे दिन' म्हणजे बालाकोट, पुलवामा आणि घुसून मारले, हेच असल्याचे सामान्य माणसांवर बिंबवण्यात सरकारची यंत्रणा यशस्वी झाल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी बुधवारी (ता. 28) केली. 

पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्ट आयोजित "जगन फडणीस स्मृती शोधपत्रकारिता' पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. "सकाळ' पुणेचे बातमीदार ज्ञानेश सावंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

"पर्यायांच्या चक्रव्यूहात भारत' या विषयावर केतकर यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""लोकशाहीत राहून स्वदेशी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपले राज्य कसे असावे, हे ठरवण्याचा अधिकारही केंद्राने आपल्याकडे घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात आपले राज्य आपण टिकवायचे, की केंद्राच्या ताब्यात सारे देऊन टाकायचे आणि धुंदीतच रमायचे, यातील योग्य पर्याय आपल्यालाच ठरवून पुढची वाटचाल करावी लागेल.'' 

"""सकाळ'ने वेळोवेळी प्रोत्साहन दिल्यानेच शोधपत्रकारितेत विविध प्रयोग करू शकलो. जगन फडणीस यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे आता आणखी जबाबदारी वाढली आहे,'' असे मनोगत ज्ञानेश सावंत यांनी व्यक्त केले. 

"सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांचा कार्यक्रमात सत्कार झाला. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी स्वागत केले. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत चाचे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. महादेव नरके या वेळी उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com