तुम्हाला अहिल्यादेवींचा वृक्ष लागवडीचा ९-११ कानून माहितीयं का? ‘या’ ५ झाडांना त्यांनी दिले प्राधान्य, कारण...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात ९-११चा कायदाच केला. प्रत्येकाला २० झाडे लावून द्यायची आणि त्याचे जतन करणाऱ्यांना ९ झाडांचे उत्पन्न तर ११ झाडांचे उत्पन्न सरकारला द्यायचे, असा तो कायदा होता.
Ahilyadevi Holkar
Ahilyadevi Holkarsakal

सोलापूर : पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, निसर्ग स्वच्छ, सुंदर तर माणसांचे आरोग्य निरोगी, असे समजून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात ९-११चा कायदाच केला. प्रत्येकाला २० झाडे लावून द्यायची आणि त्याचे जतन करणाऱ्यांना ९ झाडांचे उत्पन्न तर ११ झाडांचे उत्पन्न सरकारला द्यायचे, असा तो कायदा होता. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचीही योजना त्यांचीच होती, असे जाणकारांचे मत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७६७ ते १७९५ या काळात राज्यकारभार केला. त्यांनी भविष्याचा वेध घेऊन त्यावेळी वृक्ष लावगडीला प्रोत्साहन दिले. प्रत्येकांनी फळांची २० झाडे लावायची, त्यातील ११ झाडांचे उत्पन्न सरकारला जमा करायचे आणि नऊ झाडांचे उत्पन्न त्या शेतकऱ्याने स्वत:साठी ठेवायचे, असा कायदा करून त्यांनी वृक्ष लागवडीची चळवळ उभारली. त्याचवेळी त्यांनी राज्यातील माळराने भूमिहीन लोकांना दिली. त्याठिकाणी देखील त्यांनी पाच प्रकारची फळझाडे लावावीत, असे आवाहन केले.

त्यानुसार माळरानांवर देखील मळा फुलला आणि त्यांच्या या चळवळीत मोठा लोकसहभाग त्यांना लाभला. दरम्यान, माहेराहून सून सासरी येताना किंवा सासरहून लेक माहेरी जाताना तिला उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून अहिल्यादेवींनी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष विशेषतः: वडांची झाडे लावली. घरासमोर उंबर असावे, असाही त्यांचा आग्रह होता असे जाणकार सांगतात. उपाशीपोटाला आधार आणि दिवस-रात्र ऑक्सिजन देणारे झाड असा त्यामागील हेतू होता. सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून वृक्ष लागवडीवरच भर दिला जात असून त्यासाठी लोकसहभाग देखील घेतला जात आहे. त्यामागे अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा असल्याचे पाहायला मिळते.

‘या’ पाच झाडांसाठी अहिल्यादेवींचा आग्रह

माळरानावर, शेतात प्रत्येकांनी वृक्ष लागवड करताना विशेषत: पाच झाडे लावावीत, असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आग्रह होता. त्यात वड, पिंपळ, आंबा, उंबर व कवट या झाडांचा समावेश होता. फळांसोबतच ही झाडे दिवस-रात्र ऑक्सिजन देतात हा त्यामागील हेतू होता.

अडीचशे वर्षांपूर्वी दुरदृष्टी ठेवून उभारली वृक्ष लागवडीची चळवळ

राज्यातील प्रजेचे जगणे सुधारावे या मूळ हेतूने त्यावेळी दूरदृष्टिने अहिल्यादेवींनी वृक्ष लागवड आणि प्रवाशांच्या विश्रांतीसाठी रस्त्यांलगत झाडे लावली व पिण्यासाठी पाण्याची सोय केली. आज आपण ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे म्हणतोय. पण त्याची सुरवात अहिल्यादेवींनी अडीचशे वर्षांपूर्वी केली होती, असे त्यांचे महान कार्य आहे.

- गोविंद काळे, अभ्यासक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com