वडिलांनी मालमत्ता मुलांच्या नावावर करताना
वडिलांनी मालमत्ता मुलांच्या नावावर करतानाSakal

मुले सांभाळत नाहीत का? प्रांताधिकाऱ्यांकडे करा अपील अन्‌ परत मिळवा वाटलेली प्रॉपर्टी

वडिलांनी मालमत्ता मुलांच्या नावावर करताना ‘८५’अंतर्गत वाटप केले असल्यास त्याविरूद्ध ते प्रातांधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात. मुले सांभाळत नसतील तर आपल्या अज्ञानामुळे किंवा मुलांनी विश्वास संपादित करून मालमत्ता नावावर करून घेतली म्हणून कधीही न्याय मागू शकतात.

सोलापूर : मुलांना जन्म दिला, त्यांचे बालपणाचे हट्ट पुरवले. स्वतः:च्या पोटाला चिमटा घेऊन मुलांना पोटभर खाऊ घातले. त्यासाठी वाटेल ते कष्ट (काम) केले. स्वतः:ला जखम झाली तर अंगावर काढली, पण मुलांच्या जखमेच्या वेदना माता-पित्यांनी सोसल्या. चांगले शिक्षण देऊन नोकरीसाठी प्रोत्साहित केले, पुढे विवाह लावून दिला. पण, उतारवयात माता-पित्यांच्या आधाराची काठी बनण्याऐवजी त्याच मुलांनी जन्मदात्यांची प्रॉपर्टी घेऊन त्यांना घराबाहेर काढले आहे. काहीजण त्यांचा सांभाळ देखील करीत नाहीत, अशी स्थिती आहे. त्याच पालकांना किंवा विवाहित मुलींना मुलांच्या नावावरील प्रॉपर्टी पुन्हा परत घेण्याचा अधिकार आहे.

वडिलोपार्जित प्रॉपर्टी व आई-वडिलांनी कमावलेली मालमत्ता, याबाबतीत कायदे वेगवेगळे आहेत. प्रॉपर्टी कोणाला किती द्यायची हा अधिकार संबंधित पालकांनाच आहे. त्यासाठी ते मृत्यूपत्र देखील करू शकतात. पण, वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलींना पण तेवढाच अधिकार आहे. वडिलांनी आपल्या नावावरील मालमत्ता मुलांच्या नावावर करताना ‘८५’अंतर्गत वाटप केलेले असल्यास त्याविरूद्ध ते प्रातांधिकाऱ्यांकडे अपील करू शकतात. मुले सांभाळत नसतील तर आपल्या अज्ञानामुळे किंवा मुलांनी विश्वास संपादित करून मालमत्ता नावावर करून घेतली म्हणून ते कधीही न्याय मागू शकतात. दुसरीकडे मुली देखील भावाच्या नावावरील मालमत्तेत हिस्सा मागू शकतात. ज्यावेळी मालमत्ता मुलांच्या नावावर झालेली असते, त्यावेळी मुलींना काहीच हिस्सा मिळाला नसल्यास त्यांना दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. त्यावर काही दिवसांत प्रांत निर्णय देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेश करून ते वाटप रद्द करू शकतात. तसेच बहिणी स्व:इच्छेने त्यांचा हिस्सा भावाला संमतीने देऊ शकतात.

विलंब माफीसह करता येईल अपील

वडिलांनी मुलांच्या नावे केलेली प्रॉपर्टी परत मागण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. मुले पालकांना सांभाळत नसतील किंवा मुलींना हिस्सा न देताच मुलांच्या नावे मालमत्ता केली असल्यास मुलीदेखील त्यात हिस्सा मागू शकतात. त्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल करावे लागते. खूप वर्षे झाली असल्यास विलंब माफी अर्जासह अपील करता येते.

- ज्योती पाटील, प्रातांधिकारी

पोटगी मागण्याचा पालकांना अधिकार

मुलांसोबत सगळे व्यवस्थित असताना वडिलांनी स्वतः:च्या नावावरील वडिलोपार्जित मालमत्ता मुलांच्या नावे करताना मुलीला हिस्सा दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पुढे काहीजण आई-वडिलांचा सांभाळ करीत नाहीत. अशावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम २४७ नुसार संबंधित आई-वडील मुलांना दिलेली मालमत्ता परत मागू शकतात. त्यासाठी त्यांना प्रातंधिकाऱ्यांकडे अपील दाखल करावे लागते. सात ते २१ दिवसांत अपील करणे अपेक्षित आहे. पण, विलंब झाला तरीदेखील अर्ज करता येतो. तसेच मालमत्ता परत घ्यायची नसल्यास उदरनिर्वाहासाठी ज्येष्ठ नागरिक निर्वाह भत्ताअंतर्गत पोटगी सुद्धा मागू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com